२००९ वर्ष कसे असेल ?
आर्थिक संकट हे सर्व जगाला सतावत आहे. अमेरीकेत ह्याचा झटका जरा जोराने बसत आहे. जर आपण अमेरीकेची व्यवस्था पाहिली तर "उधारी वर चालणारी व्यवस्था" असे संबोधले तर ते गैर होणार नाहि. मी १९२० ते २०२० अशा शंभर वर्षांचा अभ्यास करत होतो. ग्रहांचे कार्यकत्व, राजनैतिक आणि आर्थिक चढ उतार ह्यांचा अभ्यास करत होतो. त्यानुसार मी काहि निष्कर्ष काढले आहेत.
वैदिक ज्योतिष हे वैयक्तिक भविष्याच्या दृष्टिकोनातुन आणि मानवी जीवनाचे अंतिम ध्येय मुक्ति हे आहे, असे गृहित धरुन गणितं मांडली जातात. मेदनिय ज्योतिष शास्त्र हे "स्टॅटिस्टिक्स व प्रॅबेबिलीटि थिअरी" च्या जवळपास मोडते. ह्या आधारे.. ग्रहांची गती हि महत्त्वाची असते. वक्रि ग्रह, नेपच्युन-प्लुटो सारखे ग्रह,ग्रहणे व राहु आणि केतु ह्या बींदुंना अधिक महत्त्व दिले जाते. मेदनीय ज्योतिष शास्त्र हे सामाजिक घटना, आर्थिक व्यवस्था, राजनैतिक व्यवस्था आदि प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठि महत्त्वाचे ठरते. इतिहास संशोधकांनी ह्या शास्त्राचा उपयोग काहि घटनां, सामाजिक व्यवस्था, राजनैतिक स्थिती आदि जाणुन घेण्या साठि हि केला आहे. उदा.. येशु चा जन्म, शिवाजी महाराजांचा जन्म, महाभारताचा काळ आणि घटना आदि...
अनेक मित्र व परीचितांनी हा प्रश्न गेल्या आठवड्यात विचारला कि आता पुढे काय होणार ? २००९ कसे असेल? ओबामा यशस्वी होइल का ? भारताचे भवितव्य कसे असेल ? ई . ई...
ह्यातिल काहि प्रश्नांची उत्तरे मी हि शोधतो आहे. ज्यांचा विश्वास मेदनीय ज्योतिष शास्त्रावर आहे त्यांच्या साठि काहि भकिते देत आहे.
१ जाने ते २६ जाने : राजनैतिक उलथापालथ.. नव्या नेत्यांचा उदय ( ओबामा शपथविधि २० जाने)
जाने ते जुलै : आर्थिक संकट अधिक तीव्र होउन १९२३-२९ च्या मंदिची आठवण करुन देणारा.
२६ जाने - २ जुलै : भारतात राजनैतिक उलथापालट, नव्या व्यवस्थे चा आणि नव्या नेत्याचा उदय. बहुतेक हा (हि) नेता मायवति असण्याची शक्यता.
मार्च २००९- जुलै २०१० : एका मोठया युध्दा ची शक्यता. / मोठ्या प्रमाणावर मृत्यु / नव्या रोगांचा उदय
मार्च २००९- जुलै २०१०: तीव्र आर्थिक मंदि
ओबामा बद्दल मी विशेष अभ्यास करुन असे भकित करतो कि मार्च २००९- जुलै २०१० हा काळ ओबामाला आणि अमेरीकेला लाभदायक नाहि. अनेक स्तरांवर अपयश , अचानक गोंधळाचे वातावरण, मानसिक व शारीरीक त्रास सहन करावे लागणार आहेत. २०११ ते २०२० हा ओबामा ला अतिशय लाभदायक ठरणार आहे.
भारतात आर्थिक व्यवस्था हि जुलै २०१० पर्यंत नाजुक असणार आहे. अनिश्वितता, आर्थिक संकट, युध्द/ रोगा मुळे मोठ्या प्रमाणात मृत्यु, राजनैतिक नेतृत्वा चा अभाव हे मुख्य प्रश्न भेडसावतिल. भारताचा नव्याने उदय हा २०१४ पासुन सुरु होइल असे मला वाटते.
२००९ चा पुर्वाध (जुलै पर्यंत) हा मंद व मंदिचा असेल. जुलै २००९ ते नोव्हे २००९ हा महत्त्वाचा, अनिश्विततेचा व पुन:बांधणी चा काळ असणार आहे. धार्मिक व तांत्रिक विद्दे कडे लोक झुकतील. २०११ ते २०१४ हा एक नव्या नेत्याचा उदय दाखवतो. २०२० मधे भारताच्या आर्थिक उन्नति ची सुरुवात होइल.